शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

कोरेगाव-भीमा दंगलीत मराठा संघटना : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:59 IST

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल मराठा समाजातील काही संघटनांनीच भडकवली, असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देदंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल मराठा समाजातील काही संघटनांनीच भडकवली, असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. या दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव ते पेरणे फाट्यादरम्यान अज्ञातांकडून वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत चाळीसवर वाहनांचे नुकसान झाले. या परिस्थितीमुळे महामार्गालगतची गावे बंद ठेवण्यात आली होती. दगडफेकीनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. या दंगलीतून मराठा आणि दलित समाजातील दरी वाढवून आपली पोळी भाजून घेण्याचा काही संघटनांचा हेतू होता. परिस्थिती लक्षात घेतल्यास या दंगलीमागे काही मराठा समाजातील संघटनांचाच हात होता, असे दिसत आहे. हे जरी खरे असले तरी, दंगलीनंतर दि. २ आणि ३ जानेवारीला मराठा आणि दलित समाजातील वाद संपविण्यासाठीही मराठा समाजातील काही सामाजिक काम करणाºया पदाधिकारी आणि पोलिसांनीच मध्यस्थी केली. यामुळे दोन्ही समाजातील वाद निवळला आहे.महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठा-दलित वाद परवडणार नसल्यामुळे दोन्ही समाजांनी गुण्यागोविंदाने एकत्रित राहिले पाहिजे. दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.3प्रकाश आंबेडकर तमाशातील राजाकोरेगाव-भीमा दंगलीमध्ये दलित समाजावर अन्याय झाला. या संतापातूनच समाज रस्त्यावर उतरला होता. मी मंत्री असल्यामुळे महाराष्ट्र बंदची हाक देऊ शकत नव्हतो. याचा गैरफायदा घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी लगेच बंदची हाक दिली. राज्यभरातून त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. प्रकाश आंबेडकर तमाशातील राजा झाल्याप्रमाणे वागत होते. एका दिवसात राजा होत नाही. समाजाने केलेल्या आंदोलनाचे श्रेय घेणे चुकीचे आहे. या आंदोलनात बहुतांशी माझेच कार्यकर्ते होते, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.उध्दव ठाकरे यांची नाराजी नरेंद्र मोदी, अमित शहापर्यंत पोहोचविलीकेंद्र आणि राज्यात २०१९ मध्ये होणाºया निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपची युती कायम राहणार आहे. मित्रपक्षांना बरोबर घेतल्याशिवाय सत्ता टिकविता येत नाही. शिवसेनेला केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याची गरज असतानाही भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची ही नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. ते महिन्याभरात ठाकरे यांची नाराजी दूर करून भविष्यात भाजपबरोबर युती ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. माझा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे आठवले यांनी संगितले.नीरव मोदीच्या मुसक्या आवळणारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळेबहाद्दर उद्योगपती नीरव मोदी याचा काहीएक संबंध नाही. नीरव मोदीच्या मुसक्या आवळून आम्ही बँकेतील घोटाळ्यामधील सर्व पैसे वसूल करणार आहे. भ्रष्टाचारी मंडळींना आमचे सरकार कधीच पाठीशी घालत नाही. बँकांनीही बड्या कर्जदारांना कर्जपुरवठा करताना काही आचारसंहिता घालून घेतल्या पाहिजेत. यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. बड्यांना बँका लगेच कर्ज देतात आणि छोट्यांना कर्जपुरवठा करीत नसल्याबद्दलही रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.